कृषीक्षेत्रधारकांच्या अडचणी दूर करणार

दापचरी दुग्ध प्रकल्प येथील कृषीक्षेत्रधारकांच्या अडचणी दूर करणार


 - सुनिल केदार



मुंबई प्रतिनिधी : दापचरी दुग्धप्रकाल्प येथील कृषीक्षेत्र धारकांच्या भाडेपट्टयावर दिलेल्या जमीनीबाबत व त्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय मंत्री  सुनिल केदार यांनी सांगितले. मंत्रालयात दुग्ध प्रकल्प दापचरी येथील कृषी क्षेत्र धारकांच्या अडचणी विषयी बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. केदार म्हणाले, दापचरी दुध प्रकल्प येथील उपसा जल सिंचन केंद्रावरील सर्व विद्युत मोटारी बंद असल्याने शेतीला होणारा पाणीपुरवठा बंद असल्याविषयीची समस्या समजून घेण्यासाठी आणि सोडविण्यासाठी महावितरण कंपनी सोबत सात बैठक घेण्यात येणार आहे. तसेच विद्युत दराबाबत आणि उच्च दाब विद्युत पुरवठा कमी दाबात रूपांतरीत होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे केदार यांनी सांगितले.


       केनाँल दुरुस्ती निधी उपलब्ध करण्यासाठी वित्त विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल. याबरोबरच मुख्य, कालवा, पोटचाऱ्या, रस्ते उखडले आहेत.त्याची दुरुस्ती व कृषी क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करण्याकरिता तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असल्याचे  केदार यांनी सांगितले


 दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..