विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम करत आहे. अध्यक्ष राजू पाटील.

भिवंडीतील काल्हेर येथील परशुराम धोंडू टावरे येथे अनंत तरंग महोत्सव उत्साहात संपन्न ! सरपंच हेमंत घरत यांच्या हस्ते उद्घाटन..

भिवंडी प्रतिनिधी : भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील परशुराम धोंडू टावरे येथील प्रांगणात सुरू असलेला "अनंत तरंग" महोत्सव आज (दि,४/१/२०२२) रोजी मोठ्या दिमाखात पार पडला. या महोत्सवाचे उद्घाटन कोपर गावचे नवनियुक्त सरपंच हेमंत सूर्यकांत घरत यांच्या हस्ते झाले. या ठिकाणी पुष्पलता मधुकर मढवी, कॉलेज, अभिनव बालमंदिर ताडाळी, भाग शाळाकाल्हेर, माधवराव बाल मंदिरकाल्हेर, या शाळेच्या जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

    अध्यक्ष राजू पाटील यांनी गेल्या पाच वर्ष पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्याचे काम करत आहेत.पूर्वी  दर वर्षी सहलीचे आयोजन करण्यात येत होते, परंतु सहली दरम्यान विविध प्रश्न उद्भवू लागल्याने व चिंतेचा विषय बनल्याने राजू पाटील यांनी सहली रद्द करून याच प्रांगणात विवीध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांचा सुप्त कला गुणांना वाव देण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. पुढच्या वर्षी याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने "परशुराम तरंग" व "माधवराव तरंग" महोत्सव करण्याचे ठरवले आहे.

    या कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांचा सत्कार राजू पाटील  ॲड.समीर पाटील व छत्रपती पाटील यांनी केला. तसेच याच प्रंगणात विविध स्टॉल व खेळण्याचे नियोजन करून सहलीचे व जत्रेचे स्वरूप आणण्याचे प्रयत्न केला आहे.तसेच महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देखील मिळू लागल्याचे पालक वर्गाकडून बोलले जात आहे.या महोत्सवाला मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते.या कार्यक्रमा दरम्यान आलेल्या विद्यार्थ्यांना सस्नेह भोजनाचा आयोजन देखील करण्यात आल्याने कदाचित हे तालुक्यातील पहिलेच आयोजन असल्याचे पालक वर्गाचे म्हणणे आहे. 

    या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोपर गावचे  वरिष्ठ पत्रकार अरुण पुंडलिक पाटील व नव नियुक्त सदस्य संजय पांडुरंग पाटील प्रभाकर लक्ष्मण पाटील व अस्मिता रुपेश घरत माजी सदस्य रुपेश गुरुनाथ घरत उपस्थीत होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष राजू अनंत पाटील सल्लागार ॲड.समीर पाटील उपाध्यक्ष छत्रपती पाटील सह इतर मान्यवर उपस्थित होते.या वेळी सरपंच हेमंत घरत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे, आणि त्याच शाळेच्या कार्यक्रमाला मला प्रमुख पाहुणे म्हणून उद्घाटनाला बोलवले हे मी माझे भाग्य समजतो. अध्यक्ष राजू पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी अश्याच प्रकारे इतरही कार्यक्रम राबवावे जेणे करून विद्यार्थ्यांनमध्ये व पालक वर्गात उत्साह वाढेल अशी विनंती केली. सदस्य संजय पाटील यांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिला त्यावेळी सगळ्यांचे मन भरून आले. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध कला कृतीचे प्रदर्शन भरवले होते.आलेल्या पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कला गुणांची प्रशंसा केली.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८