उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा

मुंबई प्रतिनिधी : यंदाची विजयादशमी आपल्या सर्वांच्या जीवनात यश किर्ती सुख समृद्धी आरोग्य आनंद उत्साह घेऊन येवो. राज्यावरील नैसर्गिक संकटे तसेच समाजातील अज्ञान अन्याय अंधश्रद्धा दूर होवोत अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दसरा अर्थात विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 आपल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री पवार म्हणतात की विजयादशमी अर्थात दसरा हा आपल्या सर्वांसाठी आनंदाची लयलूट करण्याचा सण. विजयादशमी म्हणजे समाजातील दुष्प्रप्रवृत्तींचा विनाश करुन सत्प्रवृत्तींचा विजय साजरा करण्याचा दिवस. असत्यावर सत्याने अज्ञानावर ज्ञानाने विजय मिळवण्यासाठी कटिबद्ध होण्याचा दिवस. यंदाच्या दसऱ्याच्या निमित्ताने राज्याच्या हितासाठी, सर्व समाजघटकांच्या विकासासाठी आपण सारे एकत्र येऊ या. आपापसातील मतभेद मनभेद वादविवाद भांडण तंटे विसरुन राज्यासमोरचे प्रत्येक आव्हान एकजुटीने एकदिलाने परतवून लावण्याचा निर्धार करु या असंही उपमुख्यमंत्री पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा

  राज्य शासनाचा सामाजिक न्याय विभाग आणि नाशिकच्या शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने नाशिक येथील त्रिरश्मी बुद्ध लेण्यांच्या पायथ्याशी विजयादशमीच्या दिवशी बोधीवृक्ष रोपण कार्यक्रम आणि ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी महाबोधीवृक्ष महोत्सवास तसेच यानिमित्ताने नाशिकला येणाऱ्या देशभरातील बुद्ध उपासक अनुयायांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८