उद्योगांसाठी लागणाऱ्या परवानग्यांची प्रक्रीया सोपी करणार

उद्योगांसाठी लागणाऱ्या परवानग्यांची प्रक्रीया सोपी करणार


खासगी गुंतवणूक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



मुंबई प्रतिनिधी : कोरोना संकटानंतर आता राज्यात उद्योगांचे अर्थचक्र सुरु झाले आहे. राज्यात गुंतवणूकदारांसाठी उद्योगस्नेही धोरणाचा अवलंब केला जात आहे. अनेक अनावश्यक परवानग्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. त्याच बरोबर गुंतवणूक वाढून रोजगार निर्मिती वाढावी यासाठी आणखी काही परवानग्यांची संख्या कमी करुन ही प्रक्रीया अधिक सोपी करणार असल्याचे तसेच खासगी गुंतवणूक संस्थांच्या प्रतिनीधींची एक समिती तयार करून राज्यातील उद्योगवाढीसाठी आवश्यक अशा सूचना या समितीच्या माध्यमातून मागविण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.


      आज खासगी गुंतवणूक संस्थांच्या (प्रायवेट ईक्विटी फर्म्स) प्रतिनीधींसोबत मुख्यमंत्र्यांनी  व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव अजोय मेहता, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. पी. अनबलगन उपस्थित होते.


      मुख्यमंत्री पुढे म्हणाले, कोरोनाने आपल्याला ‘घरी रहा- सुरक्षित रहा’ हे शिकवले आहे. याच धरतीवर राज्यातील गुंतवणूक सल्लागारांनी सर्व गुंतवणूकदारांना राज्यातच गुंतवणूक करण्याचा सल्ला द्यावा. राज्यातील त्यांची गुंतवणूक ही सुरक्षित राहिल हा विश्वास त्यांनी निश्चित ठेवावा. राज्यात ग्रीन इंडस्ट्रीला चालना देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या उद्योगांना खूप परवानग्यांची गरज नाही आणि ज्यांची लगेच सुरुवात करता येईल, अशा उद्योगांना ग्रीन उद्योग झोन मधून तात्काळ कार्यरत करण्याची प्रक्रीया सुरु करता येईल. यासाठी सिंगल विंडो सिस्टीम त्यांना मदतीची ठरु शकेल.


      दिगंबर वाघ


       कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


           घरी राहा, सुरक्षित राहा 
           प्रशासनाला सहकार्य करा...