ई प्रभागातही सहा. आयुक्त भारत पवार यांनी त्यांच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी आणि महापालिकेचे पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने मानपाडा क्रॉस रोड ते नांदीवली पर्यंत आठवडा बाजारातील टपऱ्या, फेरीवाले हटविण्याची कारवाई केली. यामध्ये त्यांनी 68 शेड, 11 टपऱ्या,15 हातगाडया, 5 गाळ्यांचे जोते यावर आज 1 जेसीबीच्या साहाय्याने कारवाई केली.अ प्रभागातही सहा. आयुक्त राजेश सावंत आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आज आंबिवली रेल्वे स्टेशन ते मोहना मार्केट परिसरात 100 फेरीवाल्यांवर कारवाई करत परिसर मोकळा केला, यापुढेही सदर कारवाई दररोज सुरू राहणार आहे.
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८