नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई प्रतिनिधी : सामाजिक क्षेत्रात ज्या महिलांनी मौलिक कार्य केले आहे. अशा महिला, संस्था व गट यांच्या सन्मानार्थ केंद्र शासनामार्फत 8 मार्च जागतिक महिला दिनांचे औचित्य साधून "नारी शक्ती पुरस्कार" देण्यात येतो.विधवा परितक्त्या निराधार अपंग महिलांचे पुनर्वसन अशा कार्यात ज्या महिलांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत अशा महिला संस्था व गटांना तसेच  शैक्षणिक प्रशिक्षण कार्य पर्यावरण क्षेत्र महिला स्वावलंबन, आणि शेती व्यवसाय काबाडकष्ट करणाऱ्या महिलांचे विविध तांत्रिक यंत्राद्वारे ज्या महिलांचे श्रम जाणीवपूर्वक कमी करण्यासाठी प्रयत्न केले अशा महिला संस्था व गट त्याचबरोबर सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांनी अधिक सहभाग घ्यावा यासाठी प्रयत्न केले अशा महिला संस्था व गट यांनी अर्ज करावेत.

    नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे वय दि. 8 जानेवारी 2022 रोजी 25 वर्ष पूर्ण असावे. त्याचबरोबर पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या संस्था संबंधित क्षेत्रात किमान 5 वर्ष कार्यरत असाव्यात.या पुरस्कारासाठी केंद्र शासनाच्या www.awards.gov.in या संकेतस्थळावर दि. 31 जानेवारी 2022  पर्यंत प्रस्ताव ऑनलाईनच सादर करावेत अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मुंबई उपनगर यांनी दिली आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८