अश्वमेध महायज्ञ आयोजित केल्याबद्दल परिवाराचे आभार मानले..

प्रधानमंत्री मोदींनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी २०२४ रोजी श्री अयोध्या धाम मधील रामलल्ला मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न करून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले.अयोध्येत  रामजन्मभूमी मंदिर बांधण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न होते आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले. समस्त विश्व गायत्री परिवार राष्ट्रात सनातन संस्कृतीचा प्रसार करून विश्व बंधुतेचा संदेश देत आहे.अखिल विश्व गायत्री परिवारातर्फे आयोजित अश्वमेध महायज्ञ ज्ञान मंच येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही भावना व्यक्त केली.यावेळी व्यासपीठावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते.

  अश्वमेध महायज्ञ आयोजित केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखिल विश्व गायत्री परिवाराचे आभार मानले.यासाठी देवभूमी महाराष्ट्राची निवड केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो असे सांगितले. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचे मन मोठे असले पाहिजे असे सांगितले.कारण मन मोठे झाले की सर्व संकटे आपोआप दूर होतात. या विचाराने केलेले कार्य समाज आणि राष्ट्राच्या विकासाकडे घेऊन जाते. अखिल विश्व गायत्री परिवारातील प्रत्येक सदस्य याच विचाराने कार्य करीत असून जगाला विश्वबंधुतेचा संदेश देत आहे.अश्वमेध महायज्ञाच्या उपयुक्तततेचा उल्लेख करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की अशा कार्यक्रमांमुळे पुण्य वाढते आणि दुर्गुण कमी होतात.प्रधानमंत्री मोदींच्या आर्थिक धोरणांचे कौतुक करताना ते म्हणाले की देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या दिशेने पुढे नेले आहे.

  केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की राजकीय व्यक्तींनी अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणे आवश्यक आहे.त्यांना अशा कार्यक्रमातून दशा आणि दिशा मिळते.राजकारण हे राज आणि नीती या दोन शब्दांपासून बनलेले आहे ज्याचा अर्थ राज्य आणि समाजाला योग्य मार्गावर नेणे.अशा घटना ही व्यवस्था मजबूत करण्याचे काम करतात.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८